चित्रान्न:
- साहित्य:
- 250 ग्रॅम तांदूळ,
- 2 टेबलस्पून तेल,
- दोन कांदे अर्धे लांब चिरून( ऐच्छिक),
- पाच/ सहा कढीलिंबाची पानं,
- दोन टेबलस्पून शेंगदाणे,
- दोन टेबलस्पून काजूगर,
- 1 टीस्पून उडीद डाळ,
- 1 टीस्पून चणाडाळ,
- सुक्या मिरच्या चार,
- अर्धा टीस्पून मोहोरी,
- अर्धा टीस्पून हळद,
- हिंग अर्धा टीस्पून,
- कैरीचा किस 2 टेबलस्पून,
- मीठ ,
- पाणी
- कृती:
- तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
- शेंगदाणे, काजूगर, चणाडाळ दहा मिनिटं गरम पाण्यात भिजत घालावे.
- कैरी किसून घ्यावी.
- सुक्या मिरच्या तुकडे करून घ्याव्यात.
- तांदुळात दुप्पट पाणी आणि एक टीस्पून मीठ घालून मोकळा शिजवून घ्यावा.
- कढईत तेल तापत ठेवावे.
- त्यात मोहोरी घाला.
- मोहोरी तडतडली की उडीद डाळ घालून थोडी परता.
- आता त्यात सुक्या मिरच्या घाला, दोन मिनिटं परतून कांदा घाला.
- तो परतला की चणाडाळ, शेंगदाणे, काजूगर एका पाठोपाठ एक परतून घ्या.
- कढीलिंबाची पानं परता.
- आता त्यात हळद, हिंग घालुन परता.
- किसलेली कैरी घालून परता.
- या सगळ्यात अर्धा टीस्पून मीठ घालून तयार भात एकत्र करा.
- सगळं नीट मिक्स करून चव बघा.
- एक वाफ येऊ द्या.
- कोथिंबीर बारीक चिरून भातावर घालून गरमागरम सर्व्ह करा.
- ✍🏻मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा